सलाहुद्दीन शेख

भिवंडी शहर पोलीस ठाणे, ठाणे शहर आणि गंगामाता वाहन शोध संस्थेने जप्त,/ रेकॉड, वरील बेवारस………वाहनांच्या मुळ मालकांचा लावला शोध

भिवंडी शहर पोलीस ठाणे येथे जप्त/बेवारस वाहने पोलीस ठाणेच्या आवारात बऱ्याच वर्षापासून धुळखात पडून आहेत. उन, वारा, पाऊसामुळे त्यांना गंज लागून वाहनांची झीज झाली आहे. बऱ्याच वाहनावरील रजिस्ट्रेशन नंबर,चेसीस नंबर,इंजिन नंबर गंजलेले आहेत. त्यामुळे शोध घेताना बरीच अडचण येत होत्या. तसेच सदर ठिकाणी दुर्गंधी पसरल्याने पोलीसांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून बेवारस वाहने ज्या मालकांची आहेत त्यांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे भिवंडी शहर पोलीस ठाणे येथे दाखवून सात दिवसांच्या आत घेवून जावे अन्यथा पोलीसांकडून त्या वाहनांची कायदेशीर प्रकीया पुर्ण करण्यात येईल असे आवाहन भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, कृष्णदेव खराडे यांनी केले आहे.

पोलीस ठाणेस शेकडो वाहने विविध गुन्ह्यात पोलीस जप्त करतात मात्र न्यायालयीन प्रकीयेमुळे व बेवारस वाहनांचे मालक मिळून येत नसल्याने ती वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक वर्ष मालकांच्या प्रतिक्षेत धुळ खात पडून आहेत. या पार्श्वभुमीवर ठाणे शहरचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण,अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग विनायक देशमुख,परिमंडळ २ भिवंडीचे पोलीस उप आयुक्त मोहन दहिकर, भिवंडी पश्चिम विभागाचे सहा. पोलीस आयुक्त/ दिपक देशमुख,यांनी बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेवून ती वाहने मुळ मालकांच्या ताब्यात देण्याचे आदेश प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत. त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, भिवंडी शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे,पोहवा/समीर तडवी, पोहवा/शशीकांत खाडे,यांचे पथक नेमून त्यांना आदेश दिले. त्यासाठी नमुद पथकाने परंदवाडी,तळेगांव ताभाडे, ता. मावळ, जि. पुणे येथील महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत यांची माहिती काढून त्यांची मदत घेतली. राम उदावंत यांनी भिवंडी शहर पोलीस ठाणे येथे येवून सर्व वाहनांची पाहणी केली. वर नमूद अंमलदारांच्या मदतीने सर्व वाहनांचे चेसीस नंबर,इंजिन नंबर क्रमांकावरून वाहनांचा मुळ मालकांचा शोध घेणकरीता प्रादेशिक परीवहन विभाग, ठाणे येथे पत्रव्यवहार करून मुळ मालकांचा शोध लावला. तसेच गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने वाहन मालकांना पत्र पाठविण्यात येणार आहे. तरी सदरच्या वाहन मालकांनी पत्र मिळताच पोलीस ठाण्यात येऊन आपले वाहन तपासुन खात्री करून कागदपत्रे दाखवुन योग्य ती कायदेशीर प्रकिया पुर्ण करून आठ दिवसांत भिवंडी शहर पोलीस ठाणे येथुन घेवून जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तरी सदरची वाहने घेवून न गेल्यास कायदेशीर प्रक्रीया पुर्ण करून त्यांचा लिलाव केला जाईल व त्यातून आलेली रक्कम सरकारी तिजोरीत भरण्यात येईल असे वरीष्ठ पोलीस निरिक्षक कृष्णदेव खराडे यांनी सांगितले आहे.