सलाहुद्दीन शेख

कल्याण तालुका पोलीस स्टेशन जिल्हा ठाणे आणि गंगामाता वाहन शोध संस्थेने गुन्हयातील जप्त व बेवारस २६ वाहनांच्या मुळ मालकांचा लावला शोध…

कल्याण तालुका पोलीस ठाणे येथे जप्त रेकॉर्डवरील, अपघात,/बेवारस वाहने पोलीस ठाणेच्या आवारात चन्याच वर्षापासून धुळ खात पडून आहेत. २६ वाहन मालकांचा शोध लागला असून ती वाहने उन,वारा, पाऊसामुळे त्यांना गंज लागून वाहनांची झीज झाली आहे. बऱ्याच वाहनावरील रजिस्ट्रेशन नंबर,चेसीस नंबर, इंजिन नंबर गंजलेले आहेत. त्यामुळे शोध घेताना बरीच अडचण येत आहे. तसेच सदर ठिकाणी दुर्गंधी पसरल्याने पोलीसांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून बेवारस वाहने ज्या मालकांची आहेत त्यांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे कल्याण तालुका पोलीस ठाणे येथे दाखवून सात दिवसांच्या आत घेवून जावे अन्यथा पोलीसांकडून त्या वाहनांची कायदेशीर प्रकीया पुर्ण करण्यात येईल असे आवाहन, कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, पंकज गिरी यांनी केले आहे. पोलीस ठाण्यात सेकड़ो वाहने वीविध गुह्यात पोलीस जप्त करतात, मात्र न्यायलयीन प्रक्रिये मुळे व बेवारस वाहनाचे मालक मिळून येत नसल्याने ती वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक वर्ष मालकांच्या प्रतिक्षेत धुळ खात पडून आहेत. या पार्श्वभुमीवर ठाणे ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ डी एस स्वामी, अप्पर पोलीस अधिक्षक,अमोल मित्तल,तसेच मुर्बाड उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड, यानी बेवारस मालकांचा शोध घेऊन ही वाहने मूळ मालकांच्या ताब्यात देण्याचे आदेश प्रभारी अधिकारी याना दिले आहेत, त्यानुसार पोलीस निरीक्षक पंकज गिरी कल्याण तालुका पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उप निरीक्षक जाधव पोलीस उप निरीक्षक डाखोरे, मुद्देमाल कारकुन शंकर बीन्नर, पो शि शंकर कु-हाडे यांचे पथक नेमून त्यांना आदेश दिले. त्यासाठी नमुद पथकाने परंदवाडी, तळेगांव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे येथील महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत व उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे यांची माहिती काढून त्यांची मदत घेतली. राम उदावंत यांनी कल्याण तालुका पोलीस ठाणे येथे येऊन सर्व वाहनांची पाहणी केली. वर नमूद अंमलदारांच्या मदतीने सर्व वाहनांचे चेसीस नंबर, इंजिन नंबर क्रमांकावरून वाहनांचा मुळ मालकचा शोध घेणकरीता प्रादेशिक परीवहन विभाग, ठाणे व कल्याण येथे पत्रव्यवहार करून मुळ मालकांचा शोध लावला. तसेच गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने वाहन मालकांना पत्र पाठविण्यात येणार आहे. तरी सदरच्या वाहन मालकांनी पत्र मिळताच आपले वाहन पोलीस ठाण्यात येऊन तपासुन खात्री करावी व वाहनाची कागदपत्रे दाखवुन योग्य ती कायदेशीर प्रकिया पूर्ण करून आठ दिवसांत कल्याण तालुका पोलीस ठाणे येथून घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरी सदरची वाहने घेवून न गेल्यास कायदेशीर प्रक्रीया पुर्ण करून त्यांचा लिलाव केला जाईल व त्यातून आलेली रक्कम सरकारी तिजोरीत भरण्यात येईल असे पोलीस निरिक्षक पंकज गिरी यांनी सांगितले आहे.