सलाहुद्दीन शेख
निजामपुरा पोलीस स्टेशन भिवंडी आणि गंगामाता वाहन शोध संस्थेने लावला १०७ गाडयांच्या मुळ मालकाचा शोध
निजामपुरा पोलीस ठाणेस दाखल गुन्हयातील, बेवारस व अपघातीतील एकुण १०७ वाहने पोलीस ठाणेच्या अवारात सन २००५ पासुन जमा आहेत त्यापैकी ८८ दुचाकी व १३ चार चाकी व ०६ अॅटो रिक्षा अशी एकुण १०७ वाहने बेवारस अवस्थेत अनेक वर्षापासुन धुळखात पडुन आहेत त्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणुन बेवारस वाहने ज्या मालकांची आहेत त्यांनी आपल्या वाहनाची कागदपत्रे दाखवुन सात दिवसाच्या आत घेवुन जावेत अन्यथा पोलीसांकडुन त्या वाहनाची कायदेशीर प्रक्रीया पुर्ण करण्यात येईल असे आवाहन निजामपुरा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी केले आहे.
पोलीस ठाणेस शेकडो वाहने विविध गुन्हयात पोलीस ज़प्त करतात मात्र न्यायालयीन प्रक्रीयेमुळे व बेवारस वाहनाचे मालक मिळुन येतनसल्याने ही वाहने पोलीस ठाणेच्या आवारात अनेक वर्ष मालकाच्या प्रतीक्षेत धुळखात पडुन आहेत या पार्श्वभुमीवर माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर अशुतोष डुंबरे साहेब यांनी बेवारस वाहनांच्या मालकाचा शोध घेवुन ती वाहने त्यांच्या ताब्यात देण्याचे आदेश प्रभारी अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, परिमंडळ ०२ चे पोलीस उपआयुक्त श्रीकांत परोपकारी व पश्चिम विभाग भिवंडी सहायक पोलीस आयुक्त दिपक देशमुख व निजामपुरा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांचे मार्गदर्शनानुसार पोलीसांनी बेवारस वाहनाच्या मालकाचा शोध घेण्यास सुरूवात केली त्यासाठी पोलीसांनी परंदवाडी तळेगाव दाभाडे, तालुका .मावळ, जिल्हा पुणे येथील महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या गंगामाता वाहन शोध संस्थेची मदत घेतली या संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत यांनी निजामपुरा पोलीस ठाण्यात येत बेवारस अवस्थेत असलेल्या वाहनाची पाहणी केली उदावंत व पोलीसांनी 107 बेवारस वाहनांचे चेसीस नं व इंजिन क्रमाकांवरून दोनच दिवसात वाहनाच्या मुळ मालकाचा शोध लावला.त्यासाठी पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिपक शेलार, (गुन्हेप्रकटीकरण अधिकारी), सपोनि चव्हाण, गुन्हेप्रकटीकरण अधिकारी), पोउपनिरी/बडगिरे, मुददेमाल कारकुन श्रेपोउपनिरी/ लोहार यांच्यासह गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, उपाध्यक्ष बाळासाहेब बागडे, संजय काळे, यांनी परिश्रम घेतले. तसेच ज्या मालकाची वाहने असतील त्यांनी पोलीस ठाणेस येवुन आपले वाहन तपासुन घेवुन जावे. तसेच सदरचे वाहन घेवुन न गेल्यास कायदेशीर प्रक्रीया पुर्ण करून त्यांचा लिलाव केला जाईल व त्यातुन आलेली रक्कम सरकारी भरणा भरण्यात येईल असे वरिष्ठ पोलीस संतोष आव्हाड यांनी सांगितले.
टिप :- असा लावला जातो शोध-
सुरवातीला वाहनाचे चेसीस व इंजीन नंबर यांची यादी केली जाते. त्यानंतर वाहनाची विभागणी करून बेवारस, अपघात व गुन्हयातील वाहने अशी वर्गवारी करून मुळ मालकाचा घराचा पत्ता शोधला जातो.अनेकदा वाहन मालकाचा जुना पत्ता रजिस्टर नोंद असल्याने मालक त्या पत्यावर मिळुन येत नाही.वाहनाची बारकाईने माहिती गोळा करून मुळ मालकापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जातो.असे संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत यांनी सांगितले.