

सलाहुद्दीन शेख
कळवा वाहतुक उपविभाग आणि गंगामाता वाहन शोध संस्थेने ३४ बेवारस वाहनांच्या मुळ मालकांचा लावला शोध……
कळवा वाहतुक उपविभाग येथे बेवारस एकुण ३४ वाहने वाहतुक उपविभागाचे आवारात बऱ्याच वर्षापासून धुळखात पडून आहेत. उन, वारा, पाऊसामुळे त्यांना गंज लागून वाहनांची झीज झाली आहे. बऱ्याच वाहनावरील रजिस्ट्रेशन नंबर,चेसीस नंबर, इंजिन नंबर गंजलेले आहेत. त्यामुळे शोध घेताना बरीच अडचण येत आहे. तसेच सदर ठिकाणी दुर्गधी पसरल्याने पोलीसांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून बेवारस वाहने ज्या मालकांची आहेत त्यांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे कळवा वाहतुक उपविभाग येथे दाखवून सात दिवसांच्या आत घेवून जावे अन्यथा पोलीसांकडून त्या वाहनांची कायदेशीर प्रकीया पुर्ण करण्यात येईल असे आवाहन कळवा वाहतुक उपविभागाच्या पोलीस निरीक्षक,आप्पासाहेब जानकर यांनी केले आहे.
पोलीस बरीच वाहने विविध गुन्ह्यात जप्त करतात मात्र न्यायालयीन प्रकीयेमुळे व बेवारस वाहनांचे मालक मिळून येत नसल्याने ती वाहतुक उपविभागाचे आवारात अनेक वर्ष मालकांच्या प्रतिक्षेत धुळ खात पडून राहतात. या पार्श्वभुमीवर ठाणे शहरचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उप आयुक्त वाहतुक विभाग ठाणे शहर पंकज शिरसाट, परिमंडळ १ ठाणे पोलीस उप आयुक्त सुभाष बुरसे, ठाणे विभागाचे सहा. पोलीस आयुक्त/श्री चंद्रकांत भोसले, यांनी बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेवून ती वाहने मुळ मालकांच्या ताब्यात देण्याचे आदेश प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक आप्पासाहेब जानकर, कळवा वाहतुक उपविभाग यांच्या मार्गदर्शना नुसार पोहवा/१११९ मुलाणी, पोहवा/१६१२ शेलार, पोना/७३६२ कडलग, मपोशि/२२८बाबर यांचे पथक नेमून त्यांना आदेश दिले. त्यासाठी नमुद पथकाने परंदवाडी, तळेगांव ताभाडे, ता. मावळ, जि. पुणे येथील महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत यांची माहिती काढून त्यांची मदत घेतली. राम उदावंत यांनी कळवा वाहतुक उपविभाग येथे येवून सर्व वाहनांची पाहणी केली. वर नमूद अंमलदारांच्या मदतीने सर्व वाहनांचे चेसीस नंबर, इंजिन नंबर क्रमांकावरून वाहनांचा मुळ मालकचा शोध घेणकरीता प्रादेशिक परीवहन विभाग, ठाणे येथे पत्रव्यवहार करून मुळ मालकांचा शोध लावला. त्या मुळ मालकांना समजपत्र पाठवून ज्या मालकांची वाहने असतील त्यांनी कळवा वाहतुक उपविभाग येथे येवून आपले वाहन तपासून खात्री करून कागदपत्रे दाखवून योग्य ती कायदेशीर प्रकिया पुर्ण करून घेवून जाण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने वाहन मालकांना पत्र पाठविण्यात येणार आहे.
तरी सदरच्या वाहन मालकांनी पत्र मिळताच आपले वाहन आठ दिवसांत कळवा वाहतुक उपविभाग येथुन घेवून जाण्याचे आवाहन करण्यात आले.
तरी सदरची वाहने घेवून न गेल्यास कायदेशीर प्रक्रीया पुर्ण करून त्यांचा लिलाव केला जाईल व त्यातून आलेली रक्कम सरकारी तिजोरीत भरण्यात येईल असे वरीष्ठ पोलीस निरिक्षक आप्पासाहेब जानकर यांनी सांगितले आहे.