
सलाहुद्दीन शेख
टोकावडे पोलीस ठाणे, जिल्हा ठाणे ग्रामीण येथे गुन्हयातील बेवारस व अपघातातील ३९ वाहने धुळ खात पडुन
टोकावडे पोलीस ठाणे येथे गुन्हयातील बेवारस व अपघातातील वाहने पोलीस ठाणेच्या आवारात बऱ्याच वर्षापासून धुळ खात पडून आहेत एकुण ३९ वाहनांपैकी २२ वाहन मालकांचा तपास लागला असून उर्वरीत वाहन मालकांचा तपास चालु असून ती वाहने उन, वारा, पाऊसामुळे त्यांना गंज लागून वाहनांची झीज झाली आहे. बऱ्याच वाहनावरील रजिस्ट्रेशन नंबर, चेसीस नंबर, इंजिन नंबर गंजलेले आहेत. त्यामुळे शोध घेताना बरीच अडचण येत आहे. तसेच सदर ठिकाणी दुर्गधी पसरल्याने पोलीसांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून अशी वाहने ज्या मालकांची आहेत त्यांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे टोकावडे पोलीस ठाणे येथे दाखवून सात दिवसांच्या आत घेऊन जावे अन्यथा पोलीसांकडून त्या वाहनांची कायदेशीर प्रकीया पुर्ण करण्यात येईल असे आवाहन टोकावडे पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक, शितलकुमार नाईक यांनी केले आहे.
पोलीस ठाणेस शेकडो वाहने विविध गुन्ह्यात पोलीस जप्त करतात मात्र न्यायालयीन प्रकीयेमुळे व बेवारस वाहनांचे मालक मिळून येत नसल्याने ती वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक वर्ष मालकांच्या प्रतिक्षेत धुळ खात पडून आहेत. या पार्श्वभुमीवर ठाणे ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधिक्षक मा.डॉ डी एस स्वामी, मा. अप्पर पोलीस अधिक्षक अमोल मित्तल, उपविभागीय पोलीस अधिकारी मुरबाड विभाग, अनिल लाड यांनी बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेवून ती वाहने मुळ मालकांच्या ताब्यात देण्याचे आदेश प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत. त्यानुसार सहा पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक टोकावडे पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उप निरीक्षक संजिव साखरे मुदेदमाल कारकुन मपोहवा/२९०१ गीता अनंता रसाळ यांचे पथक नेमून त्यांना आदेश दिले. त्यासाठी नमुद पथकाने परंदवाडी, तळेगांव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे येथील महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत व उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे यांची माहिती काढून त्यांची मदत घेतली. राम उदावंत यांनी टोकावडे पोलीस ठाणे येथे येवून सर्व वाहनांची पाहणी केली. वरील नमूद अंमलदारांच्या मदतीने सर्व वाहनांचे चेसीस नंबर, इंजिन नंबर क्रमांकावरून वाहनांचा मुळ मालकचा शोध घेणकरीता प्रादेशिक परीवहन विभाग, ठाणे व कल्याण येथे पत्रव्यवहार करून मुळ मालकांचा शोध लावला. तसेच गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने वाहन मालकांना पत्र पाठविण्यात येणार आहे. तरी सदरच्या वाहन मालकांनी पत्र मिळताच आपले वाहन पोलीस ठाण्यात येऊन तपासुन खात्री करावी व वाहनाची कागदपत्रे दाखवुन योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून आठ टोकावडे पोलीस ठाणे येथुन घेवून जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तरी सदरची वाहने घेवून न गेल्यास कायदेशीर प्रक्रीया पुर्ण करून त्यांचा लिलाव केला जाईल व त्यातून आलेली रक्कम सरकारी तिजोरीत भरण्यात येईल असे सहा. पोलीस निरिक्षक शितलकुमार नाईक यांनी सांगितले आहे.