कोल्हापूर : कनाननगर येथून अपहरण झालेल्या दोन मुलांचा सोमवारी (दि. ४) हैदराबादमध्ये शोध लागला. भीमा मोहन कूचकोरवी (वय १२) आणि रुपाली नितीन खाडे (वय ११, दोघे रा. कानाननगर, कोल्हापूर) या दोघांची सुटका करून पोलिसांनी अपहरण करणारी महिला काजल सुधाकर सूर्यवंशी (वय ३५, रा. कनानानगर, कोल्हापूर) हिला अटक केली. काजल हिने भीक मागण्यासाठी २७ ऑगस्टला दोन्ही मुलांचे अपहरण केले होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अपहरणकर्ती महिला काजल सूर्यवंशी कनाननगर येथे राहत होती. स्टेशन रोडवर भीक मागून उदरनिर्वाह करणा-या महिलेने खाऊ देण्याचे आमिष दाखवून भीमा कुचकोरवी आणि रुपाली खाडे यांना फूस लावून २७ ऑगस्टला दुपारी रेल्वे स्टेशनला नेले. त्यानंतर तिघे रेल्वेने हैदराबादला गेले. तिथे रेल्वे स्टेशनसह परिसरात मुलांना भीक मागायला लावले. दिवसभरात भीक मागून मिळालेले पैसे ती मुलांकडून काढून घेत होती.
आई-वडिलांची आठवण येत असल्याने भीमा याने रविवारी (दि. ३) रेल्वे स्टेशनवर भेटलेल्या अब्दुल मुसा या व्यक्तीच्या मोबाइलवरून घरी फोन केला. या फोनमुळे मुले हैदराबादमध्ये असल्याचे समजले. पालकांनी तातडीने याची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली.
कोल्हापुरातील अपहरण झालेल्या मुलांचा शोध लागला, संशयित महिलेस अटक
Related Posts
डोंबिवली वाहतूक शाखे तर्फे महात्मा गांधी विद्यामंदिर डोंबिवली येथे ३५ वे रस्ता सुरक्षा अभियान संपन्न..
प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : डोंबिवली वाहतूक शाखे तर्फे दि. ०९/०१/२०२५ रोजी, डोंबिवली पश्चिम येथे रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत महात्मा गांधी येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयी मार्गदर्शन करण्यात आले. डोंबिवली…
महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे अंतर्गत परिमंडळ-३, कल्याण मध्ये मुददेमाल हस्तांतरण व ‘सीएमआयएस’ ऍप चे अनावरण..
प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण : महाराष्ट्र पोलीस दलाचे स्थापनेचे औचित्य साधुन दिनांक ०२ जानेवारी ते ०८ जानेवारी २०२५ दरम्यान ‘पोलीस रेझिंग डे सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने दिनांक ०८/०१/२०२५…