प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे, दि. २२ : खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन हॉटेल व्यावसायिकाकडून ५० हजार रुपये उकळल्याच्या आरोपाखाली खंडणी विरोधी पोलीस पथकाने महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील एका आरटीआय कार्यकर्त्याला अटक केली आहे, असे एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. ठाणे पोलीसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षाने (एईसी) सोमवारी रात्री आरोपी नितीन गोळे (४९) याला अटक केली आणि स्थानिक न्यायालयाने त्याला २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

एईसीचे वरिष्ठ निरीक्षक शैलेश साळवी म्हणाले, “एका हॉटेल व्यावसायिकाकडून मिळालेल्या तक्रारीच्या आधारे, आम्ही कल्याणमध्ये सापळा रचला आणि आरोपी आरटीआय कार्यकर्त्याला ५० हजार रुपये घेताना पकडण्यात आले.” हॉटेल व्यावसायिकाकडून ५० हजार रुपये उकळल्याच्या आरोपाखाली आरटीआय कार्यकर्त्याला अटक करण्यात आली.