सलाहुद्दीन शेख

श्रीनगर पोलीस ठाणे यांच्याकडे गुन्ह्यातील जप्त/बेवारस मालमत्तेतील एकुण वाहने पोलीस ठाणेच्या आवारात बऱ्याच कालावधीपासून जमा आहेत. ही दुचाकी वाहने अनेक वर्षापासून धुळखात पडून आहेत. उन, वारा, पाऊसामुळे त्यांना गंज लागून वाहनांची झीज झाली आहे. बऱ्याच वाहनावरील रजिस्ट्रेशन नंबर, चेसीस नंबर, इंजिन नंबर त्यामुळे खराब झालेले आहेत. त्यामुळे शोध घेताना बरीच अडचण येत आहेत. तसेच सदर ठिकाणी दुर्गंधि पसरल्याने पोलीसांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून बेवारस वाहने ज्या मुळ मालकांची आहेत त्यांनी आपल्या वाहनांची मुळ कागदपत्रे श्रीनगर पोलीस ठाणे येथे दाखवून सात दिवसांच्या आत घेवून जावे अन्यथा पोलीसांकडून त्या वाहनांची कायदेशीर प्रकीया पुर्ण करण्यात येईल असे आवाहन श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, गुलझारीलाल फडतरे यांनी केले आहे.

पोलीस बरीच वाहने विविध गुन्ह्यात जप्त करतात मात्र न्यायालयीन प्रकीयेमुळे व बेवारस वाहनांचे मालक मिळून येत नसल्याने ती वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक वर्ष मुळ मालकांच्या प्रतिक्षेत धुळ खात पडून राहतात. या पार्श्वभुमीवर ठाणे शहरचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण , अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग विनायक देशमुख, पोउपआ प्रशांत कदम, सपोआ/हेंमत शिंदे, यांनी बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेवून ती वाहने मुळ मालकांच्या ताब्यात देण्याचे आदेश प्रभारी अधिकारी यांना दिले होते. त्यानुसार,वरीष्ठ पोलीस निरीक्षक गुलझारीलाल फडतरे, श्रीनगर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक धनंजय देवडीकर, (गुन्हे), पोउपनिरी / रामदास भंडागे, पोहवा/मुकेश इघे, पोहवा/वनपाल व्हनमाने पोना/राजेंद्र दणाने (मुद्देमाल कारकुण), यांचे पथक नेमून त्यांना आदेश दिले. त्यासाठी नमुद पथकाने परंदवाडी, तळेगांव ताभाडे, ता. मावळ, जि. पुणे येथील महाराष्ट्रात अग्रेसर असलेले गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष, राम उदावंत यांची माहिती काढून त्यांची मदत घेतली. राम उदावंत यांनी श्रीनगर पोलीस ठाणे येथे येवून सर्व वाहनांची पाहणी केली. वर नमूद अंमलदारांच्या मदतीने
सर्व वाहनांचे चेसीस नंबर, इंजिन नंबर क्रमांकावरून वाहनांचा मुळ मालक शोध घेणकरीता प्रादेशिक परीवहन विभाग, ठाणे येथे पत्रव्यवहार करून मुळ मालकांचा शोध लावला. त्या मुळ मालकांना समजपत्र पाठवून ज्या मालकांची वाहने असतील त्यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात येवून आपले वाहन तपासून खात्री करून कागदपत्रे दाखवून योग्य ती कायदेशीर प्रकिया पुर्ण करून घेवून जाण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने वाहन मालकांना पत्र पाठविण्यात आलेत. तरी सदरच्या वाहन मालकांनी पत्र मिळताच आपले वाहन आठ दिवसांत श्रीनगर पोलीस ठाणे येथुन घेवून जाण्याचे आवाहन करण्यात आले.

तरी सदरची वाहने घेवून न गेल्यास कायदेशीर प्रक्रीया पुर्ण करून त्यांचा लिलाव केला जाईल व त्यातून आलेली रक्कम सरकारी तिजोरीत भरण्यात येईल असे वरीष्ठ पोलीस निरिक्षक गुलझारीलाल फडतरे यांनी सांगितले आहे.

टिपः-असा लावला जातो शोध
प्रथम वाहनांचे रजिस्ट्रेशन नंबर, चेसीस नंबर, इंजिन नंबर, यांची स्वतंत्र यादी केली जाते, त्यानंतर वाहनांची विभागणी करून गुन्ह्यातील वाहने अपघातातील वाहने, बेवारस वाहने अशी वेगवेगळी वर्गवारी करून प्रादेशिक परीवहन विभाग यांना पत्रव्यवहार केला ‘जातो. त्यांच्या मार्फतीने मुळ मालक मुळ मालकाचा पत्ता, मोबाईल नंबर याचा शोध घेतला जातो. मुळ मालकांना पत्रव्यवहार करून स्वताःच्या वाहनांची खात्री करून योग्य ती कागदपत्रे सादर करावयास लावून अटी व शर्तीवर कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून मुळ मालकांच्या ताब्यात दिली जातात. अनेकदा रजिस्टरवर वाहन मालकांचा जुना पत्ता, मोबाईल नंबर, नोंद असतो परंतू मालक तिथे राहत नसल्याने दिले पत्त्यावर मिळून येत नाही. त्या वाहनांची बारकाईने माहिती गोळा करून मुळ मालकांपर्यत पोहोचण्याचा प्रयत्न केला असे संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत यांनी सांगितले.